भोंडल्याची गाणी/काळी चंद्रकळा

काळी चंद्रकळा नेसू कशी
पायात पैंजण घालू कशी
दमडीचं तेल आणू कशी
दमडीचं तेल आणलं
मामंजींची शेंडी झाली
भावोजींची दाढी झाली
सासूबाईंचं न्हाणं झालं
वन्सबाईंची वेणी झाली
उरलेलं तेल झाकून ठेवलं
हत्तीणीचा पाय लागला वेशीबाहेर ओघळ गेला
त्यात उंट पोहून गेला
सासूबाई सासूबाई अन्याय झाला चार चाबूक अधिक मारा
दहीभात जेवायला घाला माझं उष्टं तुम्हीच काढा.

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.