महर्षी व्यासांनी रचलेले व गणपतीने लिहीलेले हे महाकाव्य आहे. हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे.

महाभारताची पर्वे संपादन

पर्व क्र. पर्वाचे नाव उप-पर्व संक्षिप्त ओळख
आदि पर्व १-२० ओळख, राजपुत्रांचा जन्म व शिक्षण
सभा पर्व २१-२८ राजसभा, द्यूतक्रीडा व पांडव वनवासाला जातात.
अरण्य पर्व २९-४४ पांडवांचा बारा वर्षांचा वनवास
विराट पर्व ४५-४८ अज्ञातवासाचे विराट नगरीतील वनवासाचे शेवटचे एक वर्ष
उद्योग पर्व ४९-५९ युद्धाची तयारी
भीष्म पर्व ६०-६४ महायुद्धा पहिला भाग म्हणजेच भीष्म कौरवांचे सेनापती असतानाचे पहिले दहा दिवस
द्रोण पर्व ६५-७२ युद्धाचा पुढील भाग जेव्हा द्रोण हे कौरवांचे सेनापती होते
कर्ण पर्व ७३ कर्ण कौरवांचा सेनापती असतानाचे युद्धाचे वर्णन
शल्य पर्व ७४-७७ युद्धाचा शेवटचा भाग जेव्हा शल्य कौरवांचा सेनापती होते
१० सौप्तिक पर्व ७८-८० अश्वत्थामाने रात्रीच्या अंधारात झोपलेल्या(सौप्तिक) पांडवपुत्रांवर पांडव समजून केलेले आक्रमण
११ स्त्री पर्व ८१-८५ गांधारी व इतर स्त्रियांनी मृतांसाठी केलेला शोक
१२ शांति पर्व ८६-८८ युधिष्ठिराचा राज्याभिषेक व भीष्मांचा युधिष्ठिराला उपदेश
१३ अनुशासन पर्व ८९-९० भीष्मांचा युधिष्ठिराला अखेरचा उपदेश
१४ अश्वमेध पर्व ९१-९२ युधिष्ठिराने केलेला अश्वमेध यज्ञ
१५ आश्रमवास पर्व ९३-९५ धृतराष्ट्र, गांधारी, विदुर व कुंती यांचे वनाकडे प्रस्थान व वणव्यात मृत्यू
१६ मुसळ पर्व ९६ मुसळाचा शस्त्राप्रमाणे वापर करून यादवांचे झालेले गृहयुद्ध (यादवी)
१७ महाप्रस्थान पर्व ९७ पांडवांच्या स्वर्गारोहणाचा सुरुवातीचा भाग
१८ स्वर्गारोहण पर्व ९८ युधिष्ठिराचा सदेह स्वर्गात प्रवेश
खिला हरिवंश पर्व ९९-१०० श्रीकृष्णाचे चरित्र


  हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.