सप्तशती गुरूचरित्र/अध्याय अठ्ठाविसावा

जो दूरी त्यजी धर्मास । मायाबापदेवगुरुस । निर्दोष स्त्रीपुत्रास । चोर असत्यवादी जो ॥१॥

जो निरंतर अशुद्ध । हरिहरां करी भेद । हो पाखंड दुर्वाद । पंक्तिभेद करी खळ ॥२॥

मारी यत्‍नें जीवा क्रूर । जाळी वनग्रामघर । विकी कन्या गोरस मंत्र । फिरवी विप्रअतिथीतें ॥३॥

जो निंदक श्राद्धातें । न करी फोडी कूपांतें । तोडी मार्गाश्रयवृक्षातें । जेवी व्रतातें सोडून ॥४॥

जो दिवापर्वणीं स्त्रीशीं । भोगी रमे परस्त्रीसी । करी विश्वासघातासी । दत्तदानासी घे पुनः ॥५॥

जो स्वप्नोपमसुखार्थ । मारणादि करी व्यर्थ । परतापी करी अनर्थ । नाडी नेणत दे औषध ॥६॥

तो पतित होयी मांग । जो करी वृषलीसंग । करी स्नानसंध्यांत्याग । पंचयाग टाकून जेवी ॥७॥

जो होय वृत्तिरत्‍नहर्ता । दुष्प्रतिग्रही दुर्भोक्ता । मद्य पीतां ये हीनता । अनुतप्ता दोष थोडा ॥८॥

जो लुच्चा जिती विप्रात । हूं तूं करी पितृगुरुंस । तो होयी ब्रह्मराक्षस । हो वायस निर्मंत्राशी ॥९॥

तो कप्युदरीं जन्म घे । चोरुनि जो फळपत्र घे । जो धन चोरुनि घे । जन्म घे तो उंटाचें ॥१०॥

हो उत्क्रान्तीनंतर । नरकवास घोर । ह्या योनी त्या नंतर । दंभकर बगळा हो ॥११॥

माशी मधुहर उंदीर । धान्यहर जळहर । चातक पशु तृणहर । स्वर्णहर कृमिकीट ॥१२॥

दुर्गती आधीं भोगून । होतां पुण्यपाप समान । अंधपंग्वाद्यघचिन्ह । ये घेऊन येथें पुन्हां ॥१३॥

कृमीश्व खर जारकर्मे । स्त्री नरां गती हे दुष्कर्में । जे वागती सत्कर्मे । स्वधर्में तरती ते ॥१४॥

हो परःस्पर दंपती । दोषी ऐसें गुरु बोलती । पुसे त्रिविक्रम निष्कृती । सांगती गुरु तया ॥१५॥

तरी गृहीत ब्रह्मदंड । शरण विप्रां पापखंड । हो होता पाप उदंड । कृच्छ्रमुंडपूर्वक कीजे ॥१६॥

शक्तिहीनें गोधन द्यांवे । जप यात्रा होम करावे । शक्तें चांद्रायण करावें । गव्य प्यावें अनुतापें ॥१७॥

स्वात्मत्वैश्वर्ययुक्त । गुरु वारी सर्व दुरित । पितृत्यागें हो पतित । होई पूत मासस्नानें ॥१८॥

पतितानें ते ऐकून । म्हटलें मी झालो पावन । घ्या विप्रांत मेळवून । ते ऐकून गुरु म्हणे ॥१९॥

होऊनि नृप विश्वामित्र । सायासें झाला पवित्र । तूं हीन वेदापात्र । ये परत्र विप्रकुळीं ॥२०॥

तो आसंन येतां स्त्रीला । स्पर्शभयें मारुं आला । गुरु म्हणे त्यजीन स्त्रीला । तो म्हणाला हीन होउं कीं ॥

तेतया अंगींची विभूती । लुब्धा हातीं धुवविती । ज्ञान जाउनी त्या ये भ्रांति । घरा प्रति गेला सस्त्रीका ॥

प्रणति करी त्रिविक्रम । म्हणे वारा माझा भ्रम । अंग धूता ज्ञान उत्तम । जाउनी भ्रम त्या हो केंवी ॥२३॥

इति श्री०प०प०वा०स० सारे कर्मविपाककथनं नामअष्टाविंशो०


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]