सप्तशती गुरूचरित्र/अध्याय अडतीसावा

गुरुंस भिक्षाद्याया आला । भास्कर विप्रसामग्रीला । तिघापुरति घेऊनी त्याला । भक्तीनेला प्रसादा ॥१॥

तो सर्व सामग्रीला । निजे घेऊनि उसेला । तीन मास असा त्याला । न मिळाला शून्य वार ॥२॥

त्या हास्य करिती लोक । गुरु करविती पाक । म्हणती सांगे सर्व लोक । तो सांगे सर्वा भोजना ॥३॥

ते त्याचा बोला हंसती । कण वाटयान ये म्हणती । तें तो सांगे गुरुप्रती । बोलाविती तें त्यां सर्व ॥४॥

निरहंकार तो ब्राह्मण । करी पाक सुनिष्पन्न । गुरु वस्त्रें झांकवून । नेववून वाढविती ॥५॥

द्विज हृष्टचित्त जेविती । थोर सान सर्व येती । चार हजार झाली मिती । ते जेविती आकंठा ॥६॥

अन्न दिल्हें सर्व जातीला । आचंडालश्वकाकांला । तरी तोटा नाहीं आला । जेवविला गुरुनें विप्रा ॥७॥

अन्न संपेना तें जळीं । जलचरां दे त्या वेळीं । झाली ख्याती भूमंडळीं । वर त्यावेळीं देती विप्रा ॥८॥

हर्षुनियां वदती लोक । तिघांपुरतां होता पाक । जेविले हे अमित लोक । हें कौतुक दुसरें ऐक ॥९॥

इति श्री०प०प०वा०स०वि सारे अन्नपूर्तिकरणं नाम अष्टत्रिंशं०


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]