सप्तशती गुरूचरित्र/अध्याय बेचाळीसावा

तत्र स्थोदङ्‌मानसयात्रा । करीं पंचक्रोशीयात्रा । शुक्लकृष्णपक्षयात्रा । नित्ययात्रा करी भावे ॥१॥

प्रत्यक्षचि विश्वेश्वरा । भवानी हरिधुंडीश्वरा । दंडपाणी भैरववीरा । विघ्नेश्वरा गुहा देखी ॥२॥

तूं स्थीर चित्तें करीं यात्रा । स्थापी लिंग तूं कुमारा । सुटतील येरझारा । असें म्हणोनी गुप्त झाला ॥३॥

बाळ उठोनी पहात । त्या न दिसे, झाला गुप्त । हाची माझा गुरु म्हणत । करीतसें तो यात्रा ॥४॥

अवाच्य हो शिवलीला । इष्ट वर दे तयाला । दे तो तसें गुर्वादिकांला । तो झाला विश्वकर्मा ॥५॥

द्विज तेव्हां गुरु जसें । सांगे तें ते पाहे तसे । गुरुनाथा वंदितसे । स्तवितसे सायंदेव ॥६॥

तूंची उमापती होसी । मज दाविली येथ काशी । गुरु म्हणें त्वद्वंशासी । एकविंशी घडे यात्रा ॥७॥

तूं सत्तम लोकी होसी । आतां न सेंवीं म्लेच्छासी । आणूनिया स्त्रीपुत्रांसी । आम्हापाशीं रहासेवित ॥८॥

तो नमःस्कारुनी गेला । स्वकुटुंबा घेऊनि आला । स्तवि पुनः श्रीगुरुला । कानदीस्तोत्रालापें ॥९॥

त्याचा पुत्रा नागनाथ । तया वर दे गुरुनाथ । सांगे सांयदेवा स्वस्थ । करी अनंतव्रत आजी ॥१०॥

इति श्री०प०प०वा०स०वि सारे काशीयात्रानिरुपणं नाम द्विचत्वारिंशो०


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]