अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/सीमाविरहीत जगातील व्यवस्थापन (भाग पहिला)

सीमाविरहीत जगातील व्यवस्थापन (भाग पहिला)

गाची विभागणी करण्याची सवय फक्त जमिनीवरील प्राण्यांनाच असते. पक्षी - संपूर्ण आकाशात विहार करतात, तर माशांसाठी सर्व समुद्र मोकळा असतो. त्यात त्यांनी स्वतःसाठी स्वतंत्र विभाग ठरवून घेतलेले नसतात, मात्र जमिनीवरील प्राणी स्वतःचे संरक्षण करण्याकरिता व अन्नपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी स्वतःच्या विभागची सीमारेषा आखून घेतात. सीमा आखून घेण्याची प्रत्येक प्राणी जातीची पध्दत वेगवेगळी असते.

 माणसाला भिंती उभारून स्वतःची सीमारेषा ठरविण्याची सवय असते. यापैकी काही भिंती नैसर्गिक असतात. नद्या, पर्वतरांगा, समुद्र वगैरे. तर काही भिंती या मुद्दाम बांधल्या जातात. उदाहरणार्थ, बर्लिनची भिंत, चीनची अजस्त्र भिंत इत्यादी. या भिंती उभ्या करण्याच्या सवयींतूनच भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळी राष्ट्र निर्माण झाली.

 या भिंतींप्रमाणेच माणसाच्या मनातही काही भिंती उभ्या असतात. 'युध्द ही रणभूमीवर नव्हे तर माणसांच्या मनात सुरू होतात. त्यामुळे शांतीचे बालेकिल्लेसुध्दा माणसांच्या मनातच निर्माण झाले पाहिजेत.' असं युनेस्कोच्या प्रिअँँबलमध्ये म्हटलं आहे. या मनातील भिंतीमुळं युध्द आणि सीमाविवाद निर्माण होतात.

 अन्नाच्या तुटवड्यामुळे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याने पूर्वीच्या काळी अशा संरक्षक भिंतीची आवश्यकता भासत होती, पण तो काळ आता बराच मागं पडला आहे. आधुनिक तंत्रज्ञानानं अन्न व इतर अनेक आवश्यक वस्तूंचा तुटवडा आटोक्यात आणला आहे. अनेक विकसित देशांमध्ये तर कुपोषणामुळे नव्हे तर नको तक खाण्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. अन्य देशांमध्ये दुष्काळ, वादळ, महापूर नैसर्गिक संकटे उदभवल्यास तेथे धान्य पुरवठा करण्याइतकी कित्येक राष्ट्र सबळ आहेत. मालवाहतूक क्षेत्रातही क्रांती झाल्यानं असा पुरवठा त्वरित करता येतो. तरीही जगात भूकबळी पडण्याची उदाहरणं नित्य घडतात. ती अन्नाचा तुटवडा आहे म्हणून नव्हे, तर त्याचं वाटप अयोग्य पध्दतीनं होतं म्हणून. मग प्रश्न असा की, अशा समृध्द जगात आज सीमारेषा आणि जमिनीचे तुकडे पाडणाऱ्या भिंती यांची खरोखरच आवश्यकता एक म्हण आहे. तिचा उपयोग विवाद मिटविण्यासाठी करणं आवश्यक आहे. म्हणजेच व्यवस्थापकीय कामकाज कसं चालतं, अडचणी कोणत्या असतात आणि अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी कोणत्या कसरती कराव्या लागतात याची माहिती कर्मचाऱ्यांना करून देणं गरजेचं आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या समस्यांची व्यवस्थापनाला प्रत्यक्ष ओळख होणं महत्वाचं आहे. थोडक्यात कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकांच्या आणि व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांच्या 'वंशा'ला पाठविणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी संस्थेची सत्य परिस्थिती त्यांना समजावून सांगणं आवश्यक आहे. मात्र, ती सांगताना लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या गोष्टींप्रमाणं सांगावयास हवी. सत्य तर समजलं पाहिजे, मात्र त्याचा सकारात्मक परिणाम झाला पाहिजे. नकारात्मक भावना निर्माण होता कामा नये. तशी झाल्यास व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य खचू शकतं.
 सत्य समजल्याने गैरसमज दूर होतात. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढीस लागते. संस्था हेच आपलं जीवन आहे. ती टिकली पाहिजे. वाढली पाहिजे, हे ध्येय दोन्ही बाजूंमध्ये निर्माण झालं पाहिजे. कंपनीच्या मूल्यवृध्दीमध्ये व्यवस्थापनाचं योगदान किती, कर्मचाऱ्यांचं किती याची दोन्ही बाजूंना माहिती मिळाली की, कुणाच्या कोणत्या मागण्या न्याय्य आहेत आणि नाहीत याचा निर्णय सामोपचारानं घेणं अशक्य नाही. सध्याच्या स्पर्धेच्या युगात या सामंजस्याची आवश्यकता कधी नव्हे इतकी निर्माण झाली आहे. संस्थेच्या अंतर्गत कामकाजापासून ते तयार होणाऱ्या उत्पादनांपर्यंत सर्वांची गुणवत्ता या सामंजस्यावर अवलंबून आहे. यात कुठेही कमी पडल्यास शर्यतीत मागं पडण्याची भीती असते.
 हा सुसंवाद प्रशिक्षण आणि कार्यशाळांमधून निर्माण होतो. मात्र हे एका दिवसात साध्य होत नाही. किर्लोस्कर कमिन्समध्ये सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यास तीन वर्षे लागली. अर्थात ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. मात्र ती नेटानं सुरू ठेवणं जरुरीचं आहे हे लक्षात घ्यावयास हवं.

ष्टाचार आपल्या जीवनाचा जणू एक भागच बनला आहे. इच्छा असो वा नसो, त्याच्याशी जुळवून घेणंं भाग पडतं. नैतिकतेच्या कोणत्याही नियमानुसार तो समर्थनीय ठरू शकत नाही. औद्योगिक विश्वात तर त्याचा बराच बोलबाला झाला आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टीनंं पाहिल्यास भ्रष्टाचारामुळे व्यवस्थापकाच्या प्रयत्नांची दिशा विस्कळीत होते. त्याच्या योजनांवर पाणी फिरतंं. त्यामुळंं तो अवांछनीय आहे. मात्र, उद्योग क्षेत्रात भ्रष्टाचार होत राहणार आहे. कित्येक व्यवस्थापकांना भ्रष्टाचार हटविण्याची चिंता नसते, तर भ्रष्टाचार करूनही बचावायचं कसं याची चिंता असते. अशा भ्रष्टाचार पचविलेल्या व्यवस्थापक- संचालकांचा अभ्यास करता त्यांनी पुढील तीन मार्ग अवलंबिल्याचं लक्षात येतं.

 १) भ्रष्टाचाराचा गाजावाजा होऊ नये, यासाठी आटोकाट प्रयत्न करणंं.
 २) आपल्या भ्रष्टाचारात अन्य व्यक्तींनाही समाविष्ट करून घेणंं.
 ३) लोकांच्या नजरेत भरेल अशा पध्दतीनं खर्च न करणंं.
 एखाद्या व्यवहारात भ्रष्टाचार झाला की, त्यासंबंधी आरडाओरड सुरू होतेच. काही वेळा भ्रष्टाचारातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा त्याबद्दलची चर्चाच अधिक होते. तर काही वेळा भ्रष्टाचाराच्या मोठ्या 'डील'संबंधीही इतकी बोलवार होत नाही. चलाख व्यवस्थापक भ्रष्टाचारातून होणारा फायदा अधिक असावा, पण त्यासंबंधी होणारी आरडाओरड कमीत कमी राहावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात. हे ज्याला यशस्वीरीत्या करता येतं, तो भ्रष्टाचार करूनही नामानिराळा राहू शकतो.
 भ्रष्टाचारातून मिळणारे फायदे पुढील प्रकारचे असतात.
 १.थेट आर्थिक लाभ
 २.अप्रत्यक्ष आर्थिक लाभ
 ३.सग्यासोयाऱ्यांंना नोकरी
 ४.‘सेक्स'च्या दृष्टीनंं फायदा.
 यापैकी 'सेक्स'बद्दल सर्वाधिक चर्चा होते. संस्थेतील एखाद्या महिलेला पुरुष