जसा बोल्यले कर्रय तसा कामाले करारी
सभावानं मन मोका असोद्याचा शेतकरी

कारामधी रोखठोक नही उसनउधारी
दोन देये दोन घेये असा राजा शेतकरी

असा राजा शेतकरी चालला रे आढवनी
देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकसनी

बोरू चाले कुरुकुरु तश्या पाट्या पेनाशिली
पोर्‍हं निंघाले शिक्याले कधीमधी टांगटोली

हाया समोरची शाया पोर्‍हं शायीतून आले
हुंदडत हायाकडे ढोरं पान्यावर गेले

अरे असोद्याची शाया पोर्‍हं शंबर शंबर
शायामधी भारी शाया तिचा पह्यला नंबर

इमानानं शिकाळती तठी 'आबा' मायबाप
देती अवघ्याले इद्या भरीभरीसनी माप


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.