वाग्वैजयंती/वाचकांस विज्ञापन

<poem> शार्दूलविक्रीडित

जे जे या समयी मनात भरले स्वच्छंद नानास्थळी, ते ते त्या समयी जपून धरिता ही होय गंगाजळी ! मित्रा ! ही कविता-न गद्य-इजला निर्बंध कैचा बरे ? सारे हे मनि आणुनी मग धरी 'वाग्वैजयंती' करे ॥1॥

वसंततिलका

प्रेमे, सख्या धरी हिला हृदयी सदाही, दे टाकुनी; तुडवि ही अथवा पदांही ! माते दशा समचि या गमतात दोन्ही माझी मलाच लखलाभ सदा असो ही ॥2॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.