शुंभ निशुंभ क्षोभे श्रवण करुनि रक्तबीजनाशातें ॥ खळ बळ सर्वाहि खवळे कीं वश होणार काळ पाशातें ॥१॥ वाटे देवीस करुनि कलहा खल हा निशुभ करील गट ॥ त्या मागुनि कराया दुर्गा बळ हानि शुंभ करि लगट ॥२॥ करि शुंभनिशुंमांशीं ती शक्ति परा .सुसुगंर हितातें ॥ साधुनि द्याया शक्रा त्यातें हि परा मुसंग रहितातें ॥३॥ करिती जगदंबेवरि ते दारुण बाण वृष्टि आहित रणीं ॥ सोडी देवी शर जे असुहर तापद जसेचि अहितरणी ॥४॥ छेदुनि शर जालातें द्याया मद हरुनि कंप दोघांत ॥ सर्वांगीं शर हाणी देवी त्या असुरसंपदोघांतें ॥५॥ देवीच्या सिंह शिरीं कोपें चाऊनि अघर अरवालें ॥ असुराधिपें निशुंभे धांवुनि केला प्रहार करवाले ॥६॥ देवी स्वमनांत ह्मणे शीघ्राचे हा निकर वाळविल यातें ॥ ने बाणें व्हाया यत तेजो हानि करवाळ विलयातें ॥७॥ तो शक्ति पुन्हा टांकी भ्यावं; समरांऽगणीं जिला शक्रें \। तत्काळ भगवतीनें केली तैशी ही ती द्विधा चक्रें ॥८॥ शुल निशुंभ क्षेपी तीं ये जैसा मदांघ तुर्ण करी ॥ त्यासि जसा सिंद्दीचा देवीचा मुष्ठिपात चुर्ण करी ॥९॥ टांकी निशुंभ योजिनि जे साधिला कार्य हो गदा तीतें ॥ तत्काळ चि भस्म करी निज शुलें क्षोभं भोग दातींतें ॥१०॥ न विचारी जड कीं जय साधिल देवी रणांत परशु कसा ॥ केला मग्न शिवेनें दिव्यशुकेने क्षणांत परशुकसा ॥११॥ दुर्गेनें तो मुर्च्छित करितां चि करुनि पराभव निशुभं ॥ युद्ध करी आपण ही जायासि मरुनि पराभवानिं शुभं ॥१२॥ ज्यासे दिव्यायुध धर विश्वांत ख्यात आठ भुजा गानीं ॥ ज्यासि दिली आकारें क्रौर्य ही स्पष्टा पाठ भुजगानी ॥१३॥ दिव्य रथावरि बैसुनि सर्वोऽसुर राज शुंभ आला जो ॥ त्या पाहुनि शंख शिवा वाजवि त्यां कां न चंद्रमा लाजो ॥१४॥ वाप गुण ध्वनिही करुनि बहु आद्या श्क्ति कांपवी जगती ॥ सर्वाऽसुर तेजोवध कर घंटानादही करी मग ती ॥१५॥ हरिणें हि नाद केले पर भट नादासि जे अनादरिते ॥ ज्यांहीं मदपुर्ण महा गज झाले तत्क्षणीं अनाद रिते ॥१६॥ काली उडोनि गगनी स्व कर तळांनी महीतळी ताडी ॥ त्या नांदे पाहिले जे शंखादि निनाद ते उणे पाडी ॥१७॥ ती शिवदुती हि करी जी पण अत्युच साश्वमुरथोर ॥ तेव्हा केले असुर त्रासें सोडुनि सर्व सुर थोर ॥१८॥ अतिशयित क्रोधातें त्या समयीं शुंभ दैत्य तो पावे ॥ चित्तीं ह्मणे शिवेचे घ्यावे कीं स्वाऽसु तीस ओपावें ॥१९॥ त्यासी ह्मणे जगंदंबा असुराऽपसदा रहा रहा नीचा ॥ दिधला तुला वराया हस्तांता उदार हार हानीच्या ॥२०॥ तेव्हा जय जर ऐसें ह्माणती गगनस्थ अमर परमेला ॥ हाहि मरो शीघ्र जसा तो तुजशी करुनि समर पर मेला ॥२१॥ शुंभ ज्वाला माला कुलवदना शक्ति भीषण घाडी ॥ करुनि निरास महोल्का घातें परमेश्वरी तिला पाडी ॥२२॥ राजा तेव्हांव्यापी शुंभामा सिंहनाद विश्‍वास ॥ तेचि न भ्याले बहु दृढ ज्यांसि महा शक्ति पाद वि‍श्‍वास ॥२३॥ निर्घात निस्वनानेंशुंभाचा सिम्हनाद लोपविला ॥ जो पविलें हुंकारें भंगर तो दैत्यराज कोपविला ॥२४॥ शुंभाच्या बाणांतें निज बाणाच्या शिवा महानिकरें ॥ हानिकारें तीच्या ही छेदी असुरेंद्र शत्रु हा निकरें ॥२५॥ मग जगदंबा मुर्छित पाडी शुलें तयासि विंधुन ॥ देवीप्रताप गमला तिळहि न घटजोन तोहि सिर्घुन ॥२६॥ तों तो निशुभ सुर रिपु उठला सोडुनि असावधानपण ॥ करिता इतर शिवेच्या प्रत्यय येतां असा वधा न पण ॥२७॥ देवीतें काळीतें हरितें शर व्हावयासि यश हणी ॥ संम्पन्मदांघमति निज परिनामनिरीक्षणीं नच शहाणी ॥२८॥ होऊनि अयुत भुज असुर झांकी देवीस अयुत चक्राहीं ॥ भ्यावें ज्यासि यम वरुन यक्षप वाताऽर्कवन्हि श कांहीं ॥२९॥ सुर मति सहसा मोहीं चक्र समुहीं जशीच ती लोपे ॥ तेव्हा देवी बहुतईचे समरी दुर्गातिनाशिनीं कोपे ॥३०॥ छेदी त्य चक्रातें स्वशरांही त्याही बाण जाळातें ॥ देवांते स्वोत्कर्ष त्द्दष्ट करी तत्प दैत्य पाळातें ॥३१॥ कुपितानिशुंभ शिवेंचे चुर्ण करायासि उर गदा होतें ॥ पडताळुनि धांवे तो जैसा धृतवैर उरग दाहातिं ॥३२॥ समरांत निशुंभा जी होउनि तदराति यम गदा पावे ॥ तीतें खंगे खंडुनि देवीनें कोण न मग दापावें ॥३३॥ तरि मुढ शुळ घेऊनि धांवे की जीस काळ घेरी ती ॥ मति नुमजे बाळाची प्राज्ञाही होऊनि बाळ घेरी ती ॥३४॥ दुर्गा मनीं ह्मणें मम शुलची या शत्रुंचे उर विदारु ॥ कीं हा अरतीजीवन दृढहि न दहनहि जसा उरविं दारु ॥३५॥ शुल धरुनि शुंभ हृदय शुलचि विदारितां अगा राया ॥ पुरुष निघे त्या भग्ना त्द्ददया सोडुनि जसा अगारा या ॥३६॥ भग्ननिशुंभत्द्दद्गत सुमहाबळ पुरुष युद्ध द्दढ निष्ठ ॥ श्रीमज्जगदंबेतें बाहिर निघतांचि तो ह्मणे तिष्ठे ॥३७॥ तों हांसुनि मस्तक हरि देवि न करुनि एक पल उशिरा ॥ दुर्गाऽसिपुढिन अरि जरि अद्दिपुहुनिहि बाळ मेक पळउ शिर ॥३८॥ ऐसा जगदंबेनें सुर शुत्र निशंभं हरुनि मद वधिला ॥ जो मत्त ह्मणत होता कोण करिल शस्त्र धरुनि मदवधलें ॥३९॥ जें सैन्य निशुभांचे सुर दुःसह बहुत मातलें होतें ॥ कालीनें काळम्खी बाळमुखीं तीवें घातलें होतें ॥४०॥ कांहीं शिवदुतीनें काहीं सिंहे रणांत लोळविलें ॥ कांही त्या मातृगणें स्वर्गाप्रति गौरवुनि बोळविलें ॥४१॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.