सप्तशती गुरूचरित्र/अध्याय एकविसावा

तो होय गुरुनाथ । तियेप्रति सांगे हित । कोण कोणाचा हो सुत । वद ज्ञात असे तर ॥१॥

पृथ्व्यप्‌तेजोवाताकाश । हेच आले आकारास । मायामय संबंधास । तूंचि खास रडशी कीं ॥२॥

जरी सूनू तुझा हाची । पूर्वापर असे साची । सांग कथा प्राग्‌जन्माची । तूं कोणाची स्त्री की माता ॥३॥

जैं सूर्योदयास्तानें । नित्य दिन रात होणें । तेवीं कर्में जन्ममरणें । भोगणें सुखदुःख ॥४॥

कोणी नहें निवारिती । गुणमय ते मरती । देवादिकां हीच गती । मेला मागुती न ये शोके ॥५॥

दे हा शव जाळावया । ती म्हणे जो दे अभया । बाध ये कीं त्याच्या वाक्या । कोण तया पुढें भजे ।

सांगे शांत ब्रह्मचारी । हें जा पूस औदुंबरी । येरु शव बांधुनी उदरीं । पादुकेवरी शिर हाणी ॥७॥

बोल कोणाचा ऐकेना । लोक गेले स्वसदना । पतिअह ती अंगना । आक्रोशना करीतसे ॥८॥

स्वप्नी नको रडूं म्हणून । स्वामी देती आश्वासन । पाहे जगी होवून । पुत्र संजीवन झाला ॥९॥

विप्र पाहांटेस आले । त्यांणीं नवल हें ऐकिलें । सर्वां आश्चर्य तें झालें । असें झालें वाणूं किती ॥१०॥

इति श्री०प०वा०स० सारे मृतपुत्रसंजीवनं नाम एकविंशो०


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]