सप्तशती गुरूचरित्र/अध्याय विसावा

ऐसें परिसुनी विप्र । म्हणे तेथें कोणा वर । लाधला बोला सविस्तर । ऐकें उत्तर सिद्ध म्हणे ॥१॥

एक दशग्रंथी विप्र । शिरोळग्रामीं मृतपुत्र । तद्भार्येसी एक विप्र । सांगे उग्रकर्मविपाक ॥२॥

त्वां ब्रह्मस्वशत घेतलें । तया पिशाचत्व आलें । त्याणें तुझे सुत मारिले । कर्म केलें पाहिजे त्याचें ॥३॥

दे द्रव्य दद्गोत्रासी । सेवीं मास एक गुरुसी । येरु म्हणे न मजपाशीं । द्रव्य गुरुसी सेवीं भावें ॥४॥

अभयंकर रक्षु ऐसें । म्हणूनी सेवितसे । स्वप्नीं भूत मारीतसे । राखीतसे गुरु तिसी ॥५॥

सांगे तत् परिहार जसा । जागेंपणें करी तसा । तेणें मुक्त झाला पिसा । गुरु प्रसाद दे तिला ॥६॥

ती दोन पुत्र प्रसवे । ते दोघे दिसती बरवें । थोर होतां व्रत करावें । म्हणुनी वेचिती ते द्रव्य ॥७॥

श्रेष्ठ तनयाचें व्रत । आरंभिता धनुर्वात । होवोनि तो वांकत । सन्निपात न शमें यत्‍नें ॥८॥

तो तद्भावें फिरवी नेत्र । मरे होतां अर्धरात्र माता रडे पिटी गात्र । बोधमात्र नायके ती ॥९॥

दिवस मध्यान्हीही येतां । जाळाया ती न दे प्रेता । ब्रह्मचारी स्पष्टवक्ता । तेथें येतां झाला तेव्हां ॥१०॥

इति श्री०प०प०वा०स०गु० समंधपरिहारो नाम विंशो०


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]