सप्तशती गुरूचरित्र/अध्याय सतरावा

जे चर्वित चर्वणसे । विषय भोगिताति पिसे । तारावया तया असें । करीतसे गुरु कर्म ॥१॥

विप्र मुख्याचा सुत एक । कोल्हापुरी होता मूर्ख । पशु म्हणती सर्व लोक । निंदिती दुःख वाटे त्यातें ॥२॥

विरक्ता परी तो येवून । भुवनेश्वरीसी प्रार्थून । न होता ती सुप्रसन्न । जिव्हा छेदून देतसे ॥३॥

शिरस्सुमन द्याया चिंती । देवी धाडी त्या गुरुप्रति । गुरु जिव्हा देती करिती । सुमती जाती गुरुपुढें ॥४॥

इति श्री०प०प०वा०स० छिन्नजिव्हादानं नाम सप्तदशो०


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]