सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या १२०१ ते १३००

<poem> स्वप्रकाशें चिदुपता विषय तेंचि रूपरसादिकें साकारत्वें । दृश्य जितुकें । ब्रह्मादि स्थावरांत अनेकें । सान थोर ईशजनित ॥१॥तयावरी जीवाची कल्पना । जे कां जीवसृष्टीची रचना । मनोमयात्मक भास नाना । प्रिय द्वेष्य उपेक्ष्य ॥२॥ऐसे जीव ईशसृष्ट दोनी । प्रकाशीं आत्मप्रभा चित्खाणी । दुजें नसतां साह्य उपकरणीं । येकपणीं स्वतेजें ॥३॥जैसा सूर्य आकाशींचा । दुजा साहाकारी तरी कैंचा । एकलाचि स्वप्रकाशें साचा । पदार्थमात्र प्रकाशी ॥४॥भिंती माळवदें अंगणें । जैसा आकार त्रिचतृष्कोणें । त्यामाजीं घट ठेविले भिन्नभिन्ने । सजळें भरोनी ॥५॥त्या जळामाजीं प्रतिबिंबे पडतीं । दुसरे सूर्याऐशींची वाटती । त्याची झळझळ पडली भिंती । सामान्य प्रकाशावरी ॥६॥असो भिंती आणि घट सजळ । प्रतिबिंब आणि भिंती झळझळ । येकदांचि प्रकाशी सकळ । सूर्य माध्यान्हींचा ॥७॥तैसाचि आत्मा सूर्य जगाचा । त्यावर आदि जंगमाचा । जया तळीं सर्वां उत्पत्तीचा । प्रकार जाला ॥८॥ऐसा ब्रह्मांडरूप हा मठ । भिंती रूपरसादि ह्या नीट । त्यामाजीं चारी खाणी घट । लिंगजळें भरिलें ॥९॥अथवा स्थूल मांसमय भिंती । त्यांत अविद्या घट अव्याकृति । जळ तेंचि बुद्धीची वृत्ति । आदिकरोनि सत्रा ॥१२१०॥त्या बुद्धीमाजीं आत्मसूर्याचें । प्रतिबिंब पडलें जेवीं साचें । तेंचि रूप मिथ्यात्वें जीवाचें । चिदाभास नांवीं ॥११॥त्या प्रतिभासाची झळझळ । रूपसादिकांवरी पडे सकळ । तेचि कल्पना उंच नीच बरळ । भावना जीवाची ॥१२॥पहिलें रूपादि ईशनिर्मित । वरती जीवाचें भासरूप जनित । आणि बुद्धिआदि जीवासहित । भासवी चित्प्रभा ॥१३॥जैसे भिंती घट जळासहित । प्रतिबिंब आणि भिंती झळकत । हें इतुकेंही एकदांचि प्रकाशित । निजतेजें सूर्य ॥१४॥तैशी स्थूल अविद्याबुद्धि । प्रतिभास जीवही त्यामधीं । रूपरसादि ईशजनित आधीं । त्यावरी कल्पना जीवाची ॥१५॥इतुक्यासहित जितुकें निर्माण । कार्य अथवा अज्ञान कारण । ज्ञान किंवा विपरीत ज्ञान । स्वयें प्रकाशी चित्प्रभा ॥१६॥मूळ मायेपासून तृणांत । गुणविषय पंचभूत । ईश आणि ईशजनित । आत्मप्रकाशें भासती ॥१७॥बुद्धिपासून विषयांत कल्पना । व्यापार मनोमय जे नाना । जीवजनित आणि जीवपणा । आत्मप्रकाशें भासती ॥१८॥एवं साराही इतुका आभास । वाउगा अज्ञानें भासला भास । परी आत्मा हा येकदांचि सर्वांस । आत्मप्रकाशें भासवी या श्र्लोकींचें निरूपण ऐसें । सत्यमिथ्या निवडिलें असे । आणि ईश जीवांचें निर्मित जैसें । तेंही स्पष्ट जालें ॥१२२०॥मुख्य सामान्य आणि आभासानिवडिले कळावया साधकास आणि अज्ञानकाळींही चिद्रुपासलोप नसे तें स्पष्ट जाहलें ऐसें ऐंकताचि रविदत्त । साष्टांग घाली दंडवत । जी जी महाराज हर्षें स्तवित । प्रश्र्न हेतु ठेऊनी ॥२२॥द्वैत ईशाचें आणि जींवाचें । भिन्न भिन्न साकार मनोमयाचें । निरूपण जालें संकेतें त्याचें । परी अपेक्षा उरली ॥२३॥वेद आणि शास्त्रें सारीं । हे निर्माण जाहलीं बहुधा परी । यांसी ईश कीं जीव । निर्माण करी । हें कळावें मज ॥२४॥बहू बरें म्हणून श्रीगुरु । बोलते जाले करुणाकरु । यर्थार्थचि बोलिजे साचारु । निर्भीडपणें आतां ॥२५॥जीवही साकार असेना । मा साकारत्व कैसें ईशाना । हें न कळून करिती वल्गना । उभयां साकारत्वाची ॥२६॥पुरुषत्व आलें साकारत्वासी । श्र्वासही उत्पन्न तयासी । कल्पितां वेद होणें श्र्वासीं । अति विरोध कीं ॥२७॥जरी पुरीमध्यें राहिला । पुरुष नाम यास्तव जीवाला । तरीही तया आभासाला । अभाव श्र्वासाचा ॥२८॥तस्मात् श्र्वासापासून वेदाची । उत्पत्ति म्हणता साची । अपौरुषत्व यया वचनाची । हानि होय ॥२९॥म्हणोनि अज्ञानाची कल्पना । स्वीकारिली जरी वल्गना । तरी अनुभवा उणेपणा । आणि श्रुतीसी विरोध ॥१२३०॥यास्तव लोकवार्ता सांडावी । अनुभवें प्रतीति स्वीकारावी । तरीच हे भ्रांति निरसावी । येऱ्हवीं सदृढ ॥३१॥असो स्वानुभवानुसार । बोलिजेत आहे सविस्तर । आधीं कैसा जीव कोण ईश्र्वर । पुढें वेद तो कैसा ॥३२॥मागें तुजला ईशजीवाचें । रूप निवडून दिधलें साचें । परी तें तुजला कळलें न वचे । म्हणोनि पुन्हा सांगूं ॥३३॥वृत्तिरूप माया उद्भवली । तेचि दोप्रकारें विभागली । विद्या अविद्या जे सांगितली । ज्ञानाज्ञानरूप ॥३४॥अविद्येंत जाणतेपणाचें । प्रतिभासलें रूप तें जीवाचें । विद्येत प्रतिबिंब चिद्रुपाचें । तोचि ईश्र्वर ॥३५॥अविद्या उपाधीमुळें जीवा । अन्यथात्वें भाव यावा । सूक्ष्मदेहाचा प्रकार व्हावा । विकार बुद्धिवृत्तीचा ॥३६॥बुद्धिवृत्तींत जें पडिलें । तें बुद्धि न जाय कल्पिलें । तरी मग सत्रा प्रकारें जीवत्व जालें । कासयावरुनी ॥३७॥बुद्धीचे विकार सत्रा असती । त्यांत प्राण जडत्वें पांच बोलती । त्या प्राणाचे श्र्वास उमटती । तरी ते न होती जीवाचे अज्ञानास्तव मात्र जीवानें । देहासहित तादात्म्य धरणें । तया अभिमानत्रयाचें बोलणें । पुढें निरोपूं ॥३९॥कल्पनारूप जीवें केलें । तें आतां जीवसृष्ट सांगितलें । जें जें योजना करून उभविलें । जागृतीपासून मोक्षांत ॥४०॥असो जीवांचें रूप ज्ञानाऐसें । परी तें ज्ञान नव्हे प्रतिबिंब भासे । तें बुद्धीहूनही अनारिसें । कळावें साधका ॥४१॥आतां ईश जो विद्यात्मकवृत्ति । त्यामाजीं प्रतिबिंबरूप वस्ती । जयाची तो सर्वज्ञ अमूर्ति । विद्येऐसाही नव्हे ॥४२॥तया वृत्तीपासून बहू निर्मित । जालें परी तें विकारा न पावत । अन्यथा न होऊन निवांत । स्फूर्तिरूप स्फूर्ति असे विद्यास्फूर्ति विकारा न पवे । मा ईशें कैसें अन्यथा व्हावें । नुसधें विद्या उपाधीनें असावें । उत्पत्ति हेतु ठेउनी हिरण्यगर्भ सत्रा प्रकार । त्यांत या ईशाचें जरी बिढार । म्हणावें परी सर्वांचे विकार । सर्वज्ञा न लागती ॥४५॥ऐसें ईशाचें जरी भासरूप । सांगितलें कळावया अल्प । तेथें श्र्वास ना नव्हे संकल्प । तरी योजना कैंची ॥४६॥श्र्वास हे धर्म प्राणाचे । कल्पनारूप तें जीवाचें । श्र्वास संकल्पाविण ईशाचें । रूप नुसधें स्फूर्तिरूप ॥४७॥तया स्फूर्तिज्ञानामुळें । भूत गुणादि जालीं सकळें । परी तें जीवेशाहून वेगळें । चंचळ जड दोन्ही ॥४८॥आरंभी ब्रह्मा निर्माण जाला । स्वयंभूव नामें बोलती त्याला । परी तो साकार जेणें निर्मिला । तया नांव स्वयंभू ॥४९॥साकारावरीच दृष्टि जयाची । अज्ञानास्तव बोलती तेची । कीं स्वयंभूव साकार विरिंचि । परी तें नव्हे ॥१२५०॥ अहं ब्रह्मस्फूर्ति मायेची । त्या चंचळपणीं वस्ती जाण त्याची । तेथेंचि इच्छा वसे बहुपणाची । कीं व्हावें बहुत ॥५१॥ती इच्छा परी निर्हेतुक । मनसंकल्पादि नसती तर्क । नुसधी वृत्ति निर्विकल्पक । त्या इच्छेंनें सर्व जाहलें ॥५२॥मायास्फूर्तिसहित जाणीव । इच्छाबीजेंसी जो आठव । आदिनारायण तयाचें नांव । सविशेष स्वयंभू ॥५३॥तयाचिये इच्छेसरिसे । भूतगुणादि होती अपैसे । चंचल तत्वादि होऊन सरिसे । स्थूल जाला विरिंचीचा ॥५४॥तया स्थूलामाजीं प्रवेशतां । ईशचि जाहला जीवत्वें स्वतां । मग चंचळ जड उभयतां । चळण पावले ॥५५॥देहाचा चाळक तो प्राण । विषय निवडावया मन । तया संकल्पामाजीं जीवपण । आभासरूप असे ॥५६॥पूर्वीचा जो निर्विकल्प हेतु । तोही असे बुद्धिआंतु । तोचि ईशान प्रवर्तवितु । संकल्पांसह सर्वां ॥५७॥एवं मायेसहित ईश्र्वर । ससंकल्पजीव अनेश्र्वर । या उभयांनींही केलें बिढार । साकार सप्राण ॥५८॥इतुका संघ जेव्हां मिळाला । देहीं प्राण वायु कळासिला । तेव्हां वर्णरूपें शब्द उठिला । ध्वनि नादासहित ॥५९॥शब्दगुण जरी गगनाचा । परी हेलावा पाहिजे वायूचा । त्यावरी आंवाका भासरूप तेजाचा । वरी आपाचें द्रवत्व हे चाऱ्ही मिळतांही पृथ्वी पाहिजे । जडाच्या आधारें चळण पाविजे । तेंव्हाचि हेलावियासरिसा उठिजे । शब्द हा वर्णात्मक ॥६१॥आरंभीं सामान्य ध्वनि । नादरूपें झाली उभवणी । तोचि अकार जेथून श्रेणी । पन्नास मात्रांच्या होती ॥६२॥अकारीं उकार मिळतां । ओकार उमटे पाहतां । मकार शेवटीं आदळतां । ॐ इति प्रगटे ॥६३॥पहिली स्फूर्ति अर्थरूप । अहंब्रह्म जे निर्विकल्प । तेंचि प्राण आणि मनसंकल्प । मीनतां जडत्वा आली ॥६४॥सोहं अक्षरें प्राणाच्या बळें । उठलीं त्यांत हेतु तो मिळे । तेणें सोहं शब्द हा उफाळे । हाच कीं प्रणव ॥६५॥सकारशक्ति बीजाआंत । अकार उकार मकार मिश्रित । हे चंचळपणाचे प्रकार होत । देह उपाधीमुळें ॥६६॥ध्वनीमाजीं चंचळ जाणता । ते अर्धमात्रा बोलिजे तत्वतां । तेथें मात्रेचा उच्चार न होतां । नुसधा नाद ॥६७॥तिहीं मात्रांतही नाद असे । परी ते मात्राध्वनि भिन्न दिसे । त्या ध्वनींत नुसधा जाणता विलसे । तो बिंदुत्वें कल्पावा एवं अर्धमात्रा बिंदू सहज । हाचि हकार पुरुषबीज । पहिला सकार तोचि समज । त्रिमात्रात्मक ॥६९॥एवं अकार उकार मकार । अर्धमात्रा चौथा प्रकार । पांचवा तो बिंदू साचार । ऐशीं पांच अंगें प्रणवाचीं ॥१२७०॥परी सोहं अक्षरें जीं दोन । तेंचि प्रणव पंचांग संपूर्ण । हेंचि पहावें विचारून । साधकें अंतरीं ॥७१॥ऐसा जो प्रणव उमटला । हाचि वेद स्वयंभ जाला । येकाक्षर ब्रह्म नाम जयाला । आणि मोक्षाचा सेतु ॥७२॥वेद म्हणिजे जाणणिया । तें जाणतेपण या वेदराया । येर अक्षरां कल्पिणें वायां । वेद म्हणोनी ॥७३॥तथापि शब्दाविण अर्थासी । जाणणें न घडे मुख्य जीवासी । म्हणोनी शब्दरचना व्हावयासी । पन्नास मात्रा निर्मिल्या अकारादि सोळा वर्ण । कादिमांत पंचवीस गणन । तयासी स्पर्श म्हणती विचक्षण । जे स्पर्शोन उठती ॥७५॥यरादि हे उष्मसांत । आणि हक्ष हे मुळींचे उदभूत । एवं पन्नासांची होय गणित । भिन्नभिन्न मात्रा ॥७६॥इतुकियांतही प्रणवाची । व्याप्ति असे अन्वयाची । अकारावीण तो नव्हेची । उच्चार मात्रेचा ॥७७॥भास तोचि उकाराचा । दिसणेपणा अक्षरांचा । दृश्यभास तो मकाराचा । परिणाम असे ॥७८॥एवं त्रिमात्रात्मक ॐकार । तयापासूनीच पन्नास अक्षरें । आणि सर्वांमाजींही निरंतर । व्याप्ति प्रणवाची ॥७९॥तस्मात् इतुकियाही मातृकांसी । वेदाचि म्हणावें अक्षरांसी । हे निर्माण झाले अंतरश्र्वासीं । साकार ब्रह्मयाचे ॥१२८०॥परा पश्यंती मध्यमा वैखरी । हींच स्थानें वेदाचीं चारी । चहूंपासून या येकसरी । उच्चार होतसे ॥८१॥ह्याची मातृका पुढें मागें । होतां शब्द होती अनंत प्रसंगें । म्हणोनि आहे निजांगें । अनंता वै वेदा ॥८२॥ऐसा वेद जो निर्माण जाला । तो साकार ब्रह्मयानें नाहीं केला । प्राणचि परिणामा पावला । परी न करी प्राण ॥८३॥संकल्पासहित जो जीव । तयासीही कर्तृत्वाचा अभाव । म्हणोनि ईश्र्वर जो स्वयमेव । तेणेंचि केला ॥८४॥मायेसहित जो मायावी । वाउगेंचि येकाचें येक दावी । जो शिवशक्ति नारायण नांवीं । तेणेंचि वेद निर्मिला ॥८५॥हेंही मायेचेंचि करणें आघवें । जें अज्ञानास्तव वाउगें उभवावें । परी तें जड म्हणोनि आरोपावें । आभासरूप ईशावरी जैसे बुद्धीनें केले जे जे संकल्प । ते ते जीवावरी कीजे आरोप । तैसेंचि मायेचें कृत्य मोठें की अल्प । तें ईश केलें म्हणावें असो ऐसा शब्द ब्रह्मासहिताब्रह्मा निर्माण जाला मृष्टिहेत । तो कल्पना जीवत्वें जेव्हां करीत तेव्हां अनंत प्रजा निर्मिल्या पशु पक्षी श्वापद कीटकें । स्थावर जंगमात्मक जितुकें । अवघें जोडेचि सकौतुकें । निर्माण होते जाले ॥८९॥पुढें मैथुनसृष्टि उद्भवली । सर्वही येकापासून येक जाली । परी आरंभीं संकल्पें जे प्रगटली ं ते मानसिकसृष्टि ॥१२९०॥येथेंही कोणी मंदमति । येकाचें येकचि भाविति । कीं मानसिक जे होती । तें करणें ब्रह्मयाचें ॥९१॥तो ब्रह्मदेवाचि ईश्र्वर म्हणावा । कारण कीं कर्ता जाहला सर्वां । जरी हा साकार जीव कल्पावा । तरी विरोध येतसे भूतादि तृणांत निर्माण जितुकें । हें ईशाचें कर्तव्य असे तितुकें । आतां जीवें केलें म्हणतां निकें । तरी केवढा विरोध ऐसिये आशंकेसी उत्तर । बोलिजेत आहे पहा विचार । जरी मानसिक करी अनेश्र्वर । तरी मैथुनसृष्टि ही जीवाची स्त्रीपुरुषसंयोगें उत्पत्ति व्हावी । हे जीवाचे स्वाधीनचि जरी असावी । तरी मग संतति नसतां जीवीं । तळमळ कासया प्रतिसंगासी बाळें व्हावें । ऐसें तों कोठें न संभवे । मैथुन तों दिननिशीं न सोडवें । परी पुत्रार्थ रडती ॥९६॥तस्मात् करणें नव्हें जीवाचें । मैथुन जरी स्त्रीपुरुषांचें । जेव्हां प्रारब्ध उद्भवे होणाराचें । तेव्हां ईशसत्ते होतें ॥९७॥कोणीकडे रक्तरेत । कोणीकडे साकार जन्मत । प्राण जीवही होय त्यांत । हें जीवाचे बापें नव्हे ॥९८॥तैसाचि जीवसंकल्प ब्रह्मयाचा । परी करणें हा उपाय नव्हे त्याचा । जरी स्वाधीनचि असता साचा । तरी घाबरता कासया ॥९९॥येकदां दृष्टप्रजा निघाली । ती विरिंचीशीं मैथुना प्रवर्तली । तेव्हां पळतां भूमि थोडी जाली । कोणी कैवारी ही नसे मग त्या ॥१३००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.