सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या २४०१ ते २५००

<poem> ज्ञाते निजांगें ब्रह्म होऊनी । सर्वांतें जाणती सर्वज्ञपणी ।परी जाणों न शकती ध्यातेहीपणीं । ऐशिया अनुभवा बाध गर्भस्थ मातेतें नेणती । तैसेचि बत्तीसही न जाणती । तस्मात् बत्तीस म्हणतां जाणों लाहती ।या युक्तीसीही बाध आतां स्वरूपें स्वरूप जरी जाणावें ।तरीही बाधचि थोर संभवे । द्रष्ट्याचे प्रतीतीस जें यावें । तें म्हणावें दृश्य ॥दृश्यत्व जरी जाहलें ब्रह्म । तरी केवढा हा विरोध परम ।आणि आपआपणासी जाणे सम । ऐशी युक्तिही नसे ॥४॥डोळा पदार्थ रूप पाहे । जिव्हा रसातें चाखों लाहे ।उभयतां भिन्न कर्ता कर्म आहे । म्हणोनि होती ग्राह्य ग्राहक ॥५॥परी डोळियानं डोळा पाहिला । कीं जिव्हेचा रस जिव्हेनें चाखिला ।ऐसा वृत्तांत कवणें नाहीं ऐकिला । कवणाचे मुखें तैसें ब्रह्म ब्रह्माहूनी वेगळें । असतें जरी स्वकीय लीळे ।तरी कश्चित्ही अनुभवाचे डोळे । जाणावया शकती ॥७॥ऐसें द्वैत तों ब्रह्मीं नाहीं । तरी अनुभवावें कवणें कहीं । तस्मात् अंगेंचि व्हावें न जाणतांही । सर्वनिरासें साधकें ॥८॥डोळिया डोळा पाहणें न घडे । ब्रह्मासी ब्रह्माचा अनुभव न जोडे ।जेथें द्वेताचें भानचि मोडे । तेथें जाणणें कैंचें ॥९॥जरी डोळा डोळिया देखेना । तरी डोळा डोळियासी चुकेना ।कीं जिव्हा जिव्हेसी चाखेना । वरी अरसज्ञ नव्हे ॥तैसें ब्रह्म ब्रह्मासी जाणों न शके । तरी काय ब्रह्मत्वा ब्रह्म मुके ।न जाणतांही स्वतःसिद्ध निकें । ब्रह्म ब्रह्मीं निघोट येथेंही कल्पना ऐशी करिसी ।कीं ब्रह्मीं ब्रह्म असे अविनाशी । परी कवणें रीतीं ये प्रतीतीसी ।निश्चय राखावया ॥तरी पाहें डोळा डोळिया न देखे । परी सर्व पदार्थां तो ओळखे ।जिव्हा आपण जरी न चाखे । परी सर्व रसां सेवी ॥१३॥तैसें न जाणे जरी ब्रह्म ब्रह्मासी । परी जाणे स्वप्रकाशें सर्वांसी ।हेंचि कीं प्रतीति सहजत्वेंसी । देखणा बत्तिसांचा ॥१४॥डोळा जो पदार्थातें पाहे । तो कां म्हणावा लोपला राहे ।ब्रह्मात्मा देखणा स्वतःसिद्ध आहे । लोपेना सहसा ॥१५॥डोळा अंधारीं अपेक्षी प्रकाश । ब्रह्म लयकाळींही स्वयंप्रकाश ।म्हणोनि लोपेना सहसा अविनाश । हे उघड प्रतीति पदार्थ जरी नाहींसे जाहले । तरी नेत्रें दीपासी देखिलें । तैसे स्फूर्तीतें स्वतः अनुभविलें ।जागृति अभावीं सुप्ति ॥१७॥अथवा दीप जरी निमाला । तरी डोळा पाहे अंधाराला ।मायास्फूर्तीचाही अंत जाहला । परी लय ओळखी स्वयें ॥१८॥अंधाराची प्रतीति देखिली । तेचि डोळियाची ओळखी जाहली ।स्फूर्तीचीही शून्यदशा पाहिली । स्वप्रकाशें स्वतां ऐशी उघड प्रतीति स्वयें । जयेचा लोप कालत्रयीं न होय । ऐशी विचारें कळेना सोय ।जया मंदासी ॥२४२०॥तो ब्रह्मज्ञाना नव्हे अधिकारी । तरी तो जाणावा पाषाणापरी ।तया गुरू आणि शास्त्रें सारीं । काय करितीं ॥२१॥तेणें कर्म अथवा उपासनेसी । आदरावें चित्तशुद्धि स्थैर्यतेसी ।तो पात्र नव्हेचि अपरोक्ष ज्ञानासी । पुढें अधिकार येईल ॥२२॥येथें विचारवंतचि पाहिजे । तेणेंचि निजांगें ब्रह्मत्व लाहिजे । न जाणोनि जाणणें आकळिजे । अनुभवेंवीण अनुभाव्य ऐशिया हेतु श्रुतिमाउली । यथार्थचि या रीतीं बोलिली । कीं अविज्ञात ती विज्ञात जाहली ।विज्ञात ते अविज्ञात असो विचारवंतचि येथें असावा ।येर मंदाचा संबंध न पडावा । जे अनुभवेंवीण पावले स्वानुभवातोचि धन्य धन्य ऐशिया उत्तम अधिकारिया ।श्रुति बोले बाह्या उभारूनियां । महावाक्य म्हणिजेत जया ।अथर्वण वेदींचें ॥२६॥हा आत्मा ब्रह्म अपरोक्ष । परप्रकाशें नव्हे परोक्ष ।हा जाणावा साधकें प्रत्यक्ष । स्वप्रकाशत्वें ॥२७॥आतां स्वप्रकाश परप्रकाश । हा श्रुत्यर्थाचा सारांश । तात्पर्य कैसें तें रहस्य । बोलोनि दाऊं ॥२८॥इंद्रियगोचर जो विषय । तया अपरोक्ष म्हणे न्याय ।जें जें इंद्रियगोचर न होय । तें तें परोक्ष ॥२९॥तरी मोक्षमार्गीं साधकासी । ऐशी अपरोक्षता न ये उपेगासी ।तस्मात् श्रुतीची स्वप्रीति जैशी । प्रगट करूं ॥इंद्रियं९ पाहती जे जे विषय । ते ते इंद्रियांहून भिन्न प्रमेय ।जडरूप तें आपण न होय । वेगळें तें परोक्ष ॥३१॥जें जें भिन्न आपणाहूनी । तें तें परोक्ष आपणाहून मानी ।आपण तोचि कीं न पाहे कोणी । स्वतां पाहे सर्वां ॥३२॥विषयाहून इंद्रियांकडे । या अर्थें अपरोक्षता घडे । परी यांतही विचारें निवडे । ऐसें करावें ॥३३॥पंचज्ञानेंद्रियां एक वृत्ति । मनबुद्धिचि अपेक्षिजेती ।त्या वृत्तीमाजीं जीवाची स्फूर्ति । अमुक स्फुरवावया ॥३४॥तो जीव तरी प्रतिबिंबरूपें । तोही असे जयाच्या पडपें ।जयामाजीं जीव उद्भवे लोपे । तो सामान्य आत्मा ॥३५॥एवं इंद्रियवृत्ति तिजा जीव । आणि सामान्य आत्मा स्वयमेव ।यांत कोण असे सर्व दैव । तोचि अपरोक्ष ॥३६॥मनोराज्य जेव्हां अंतरीं । होत असतां इंद्रियें सारीं ।वृत्तीमाजी मीनती परी । प्रत्यक्ष अभाव ॥३७॥अभाव इंद्रियांचा जाहला । परी आपण कोणी असे उरला ।तोचि अपरोक्ष येरां इंद्रियांला । परोक्षता आली ॥३८॥आतां वृत्ति जीवासहित । स्वप्रकाशें अपरोक्ष वाटत ।येर इंद्रियें तों परप्रकाश समस्त । जडरूप परोक्ष ॥३९॥वृत्ति जीवासहित जो आपण । वाटे अपरोक्ष स्वप्रकाशमान । यांतही पहावें विचारून । ज्ञानदृष्टी साधकें ॥२४४०॥एका वृत्तीचे प्रकार दोन । एक संकल्प एक उगेपण ।संकल्परूप तोचि बुद्धि मन । उगेपण ते वृत्ति ॥४१॥संकल्पामाजीं जीव विशेषें । स्फुरवी तो कार्यरूपी असे ।उगेपणीं कारणरूपीं वसे । तो अस्पष्ट जीव ॥४२॥असो उगेपण जेव्हां प्रगटलें । तेव्हां संकल्प विशेषत्व निमालें ।तयाचें नाहींपण अनुभविलें । जया उगेपणें ॥४३॥तस्मात् उगेपण स्वप्रकाश अपरोक्ष । संकल्प परप्रकाश जाहला परोक्ष । जीव मन बुद्धि जड हे प्रत्यक्ष ।स्वानुभवाआले आतां नुसधी वृत्ति उगेपण । कारणरूपी जीवपण ।यासहित वाटे प्रकाशमान । आत्मा अपरोक्ष ॥४५॥येथेंही साधकें समाधिकाळीं । बैसोनि पहावें स्फूर्तितळीं ।आधीं चिरकाळ उगेपणा न्याहाळी । तोचि साधी हें कृत्य ॥४६॥स्फूर्ति सहज उठे मुरे । उठतां उगीच अवकाशीं पसरे । निमतां नाहींच होय निर्धारें । पुन्हां तत्क्षणीं उठो ॥४७॥वृत्ति उठतांचि जीवत्व उमटे । वृत्ति अभावीं नासे गोमटें ।जेवीं सहज पाणी उफाळे आटे । तैसेंचि प्रतिबिंब ॥स्फूर्तीचा उद्भव पहातसे । तैसाचि लयहि अनुभवीतसे । परी उद्भवकाळीं आहेसा दिसे । नसे वाटे लयीं ॥४९॥नाहींपण वाटलें जयासी । तो आहेचि कीं लयसाक्षी अविनाशी ।वृत्ति आणि जीवाचे रूपासी । अभाव जाहला ॥२४५०॥अभावाचा जो अनुभवी । तोचि शून्यसाक्षी गोसावी । स्वयंप्रकाशें देखणा रवि । अपरोक्ष आत्मा ॥५१॥येर हे स्फूर्तीपासून इंद्रियांत । वृत्ति जीव आदि समस्त ।परप्रकाश आणि मिथ्याभूत । ते अपरोक्ष कैसेनी ॥५२॥आपण सन्मुख हें आघवें । स्वप्रकाशें अवलोकावें । तरी तेंचि आपण केंवीं व्हावें । म्हणोनि परोक्ष ॥५३॥जो सर्वांसी न दिसे । आणि सर्वांमाजीं असे । तोचि अपरोक्ष स्वप्रकाशें । त्रिकालाबाधित ॥५४॥जो अन्यासी अपेक्षीना । कीं अमुकास्तव जाहला देखणा ।तस्मात् स्वप्रकाशक पूर्णपणा । हा ब्रह्मात्मा एक ॥५५॥इंद्रियांसी मन बुद्धि पाहिजे । बुद्धीनें जीवाची अपेक्षा कीजे ।जीवेंही वृत्तिसापेक्षें असिजे । म्हणोनि परप्रकाश सर्वही आत्मसत्तें असती ।आत्मप्रकाशें वर्तती । आत्मप्रियत्वें वांचती । यासी पृथक सत्व कैचें ॥५७॥तस्मात् परप्रकाशक जडे । यांसी अपरोक्षता न घडे ।याचा लय उद्भव पाहतसे पुढें । तो स्वप्रकाश अपरोक्ष ॥५८॥ऐसियासी हा आत्मा म्हणोनी । श्रुति बोलिली निर्धारवचनीं ।सर्वांचा लय कीं असो उभवणी । कीं भलती अवस्था ॥५९॥हा शब्दाचे आदी अंतीं । मध्यें वृत्ति किंवा जीवाची स्फूर्ति ।अवलोकितसे स्वयंज्योति । हा आत्मा ब्रह्म ॥२४६०॥स्पर्शज्ञान होतां निमतां । त्वचा वृत्ति कीं जीव स्फुरतां ।आकृत्रिम प्रकाशी समस्तां । हा आत्मा ब्रह्म ॥६१॥चक्षू बुद्धीसी जीव स्फुरवी । तेणें रूपाविषय प्रतीति घ्यावी ।या इतुकिया सहजी प्रकाशवी । हा आत्मा ब्रह्म ॥६२॥जिव्हा बुद्धी वृत्ति जीव । येणें रस घेतसे अपूर्व । या इतुकिया प्रकाशी सर्वदैव । हा आत्मा ब्रह्म ॥६३॥घ्राण जीव अंतःकरणवृत्ति । सुगंध दुर्गंध निवडिती ।याचा आदि अंत जाणे स्वयंज्योति । हा आत्मा ब्रह्म ॥६४॥वाचा आदि कर्मेंद्रिय । वचनादि क्रियावृत्ति जीवें होय ।या सर्वां सहज प्रकाशमय । हा आत्मा ब्रह्म ॥६५॥ऐशी ही जागृति अवस्था सारी । वृत्तियोगें जीव अभिमान धरी ।सहज सर्वांसी जो प्रकाश करी । हा आत्मा ब्रह्म स्वप्नांतील भासविषय । किंवा कल्पना उठोनि जाय । त्या वृत्ति जीवासी प्रकाशी अद्वय ।हा आत्मा ब्रह्म ॥६७॥जीव अज्ञानें मी म्हणे कर्ता । हा तैजसाभिमानी तत्वतां । ययासी निर्विकारे जो प्रकाशिता । हा आत्मा ब्रह्म ॥६८॥कल्पनेचा लय ते सुप्ति । नेणीव नुसधी सुखविश्रांति ।अनुभवीतसे स्वयंज्योति । हा आत्मा ब्रह्म ॥६९॥तेथें नेणतेपणाचा अभिमान । घेऊन बैसला तो प्राज्ञ ।तयासीही असे प्रकाशून । हा आत्मा ब्रह्म ॥२४७०॥हें असो समाधिकालीं । ज्ञाता पडे स्वानुभव सुकाळीं । तयासीही सहजत्वें उजळी । हा आत्मा ब्रह्म ॥७१॥एवं रूपादिकीं सर्वों व्यापला । आणि प्रकाशीतसे सर्वां क्रियेला ।सच्चिदानंद सहजत्वें संचला । हा आत्मा ब्रह्म ऐसा स्वप्रकाशक अपरोक्ष ।जो उत्तम अधिकारी दक्ष । तयासी श्रुति उपदेशी प्रत्यक्ष ।हा ब्रह्म आत्मा म्हणोनि हेचि वचन अधिकारियानें ।विवेचून घेतलें गुरुमुखानें । निश्चयचि करून दृढबुद्धीनें ।जीवन्मुक्तत्वें विचरे ॥७४॥निश्चय ऐसा दृढ केला । कीं विश्र्वतैजसा नाहीं स्पर्शला ।हा बत्तीस तत्त्वांचा मेळा आपुलाला । वर्तो भलते व्यापारीं आपण आत्मा ब्रह्म असंग ।हे बत्तीस वेगळे मिथ्यात्वें जग । ऐसा हा जाहला ग्रंथिभंग ।पुन्हां जड चिद्रूप न मिळे ऐसा जो पावला समाधान ।जयासी कधींही नोव्हे उत्थान । तयाचें अल्पसें करूं कथन ।श्र्लोकार्धें ध्वनितार्थ ॥७७॥॥ क्षणे क्षणेऽन्यताभूताधीविकल्पाचितिर्नतु॥हे बत्तीस ईशादि तृणांत । होती क्षणक्षणां अन्यथाभूत ।ब्रह्मात्मा चिद्रूप सदोदित । अन्यथा नव्हे ॥७८॥मूळ श्र्लोकं बुद्धीचे विकल्प । अन्यथा होती बोलिले अल्प ।त्यावरी ईशादि तृणांत केला जल्प । कासया कोणी मानील ॥७९॥तरी बुद्धीपासून तों ऐलीकडे । देहांत विकल्पांत सांपडे । जीवही तेथें स्फूर्तित्वें आतुडे । एवं हें सर्व आलें ॥२४८०॥बुद्धीचें कारण जें आनंदमय । तेंही बुद्धीवीण कोठें जाय ।तस्मात् कारणासी घेऊन कार्य । वर्ते व्यापारीं ॥८१॥आरंभीं मायास्फूर्ति उठे । तेव्हांचि बुद्धिकार्य उमटे ।तेव्हां विद्या अविद्या जीवेश गोमटे । कां न येती ॥८२॥तस्मात् ईशादि तृणांत बत्तीस । विकल्परूपताचि असे यास ।हेचि क्षणक्षणां अन्यथा भास । होती पावती विकारा पृथ्वी आप तेज वायु गगन ।हे तों जड पहिलेच संपूर्ण । याही वरी पालट धरिती क्षणक्षण ।एकत्र पांच होतां पांच खाणी तों मुळीं विकारी । पुढें जन्मादि मरणांत विकार करी । क्षणक्षणां पालटती सारीं ।देहधारी सान थोर देहा अंतरीं पंचप्राण । हे तों उघड विकारी क्षणक्षण । तैसाचि दशेंद्रियांचा गण ।अन्यथा विकारा पावे ॥८६॥मनबुद्धीचे तों सर्वदा विकल्प । क्षणक्षणां होती संकल्प ।विकारावीण न राहती अल्प । गुणाचे कीं कामादिकांचे ऐशीच मायास्फूर्ति झणक्षणां ।उठे मुरे सर्वदा स्फुरणा । जिसवें विद्या अविद्या विक्षेप आवरणा ।करिती विकार जीव तो मायास्फूर्तिपासून । विषयांत आदळे जाऊन । यासी विकारी म्हणतां क्षणक्षणा ।किमपि दोष नाहीं ॥८९॥ही असो जीवत्वाची कथा । परी ईशही विकारी सर्वथा ।मुळींच प्रतिबिंबत्वें जाहला अन्यथा । वरी विकार प्रेरणेचा तस्मात् ईशादि तृणांत । क्षणक्षणां होती मिथ्याभूत । कारण कीं सर्वही मायाजनित । विकाराचे विकारी ॥९१॥प्रेरक ईश मायेंत आता । मा प्रेर्य जीव तो विकाराचा आथिला । येथें शंका वाटेल कोणाला । ते आधीं अवधारा कीं प्रेरक मायातीत आत्मा ब्रह्म ।बुद्धीचा असे हा श्रुतीचा नेम । आणि सर्वांसी असे विश्राम ।अधिष्ठानत्वें ॥९३॥चुंबकासन्निध लोह चळे । तेव्हां चालक चुंबक या युक्तीच्या बळें ।आणि अनुभवही बोलती सकळें । ज्ञाते कवि वेदांती ॥९४॥तस्मात् श्रुति युक्ति अनुभवेंकडून । ब्रह्म आत्माचि करी प्रेरक ।येथें प्रेरण स्थापिला ईशान । तरी विरोध वाटे ॥ऐसिया आशंकेसी उत्तर । कीजेल सत्यत्वेंसी निर्धार ।ब्रह्मात्मा प्रेरक जो प्रकार । याचें रहस्य भिन्न ॥९६॥ईश्र्वरादिही सर्व जाहले । जाहले ते स्वधर्मी व्यापारले ।या इतुकीयाचें प्रेरण कोणी केलें । ईशादि तृणांत ॥९७॥तेव्हां श्रुतीसीही विचार पडिला । कीं हा आळ घालावा कोणाला ।ब्रह्मात्मा तो असंग संचला । ईश तो प्रेर्य असे मागुतीं पाहतां विचार ।हे जाहलेच नसतां सविस्तर । मिथ्यात्वा प्रेरक जरी निर्विकार । म्हणतां बाध नाहीं ॥९९॥चुंबक स्वतां हालवीना । सन्निधानत्वें लोहो पावे भ्रमणा । तरी तो विकार न पावतां आरोपणा । केली तरी निर्घाध ॥२५००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.