सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या २७०१ ते २८००

<poem> मुख्य प्रत्यगात्मा ब्रह्म पूर्ण । सच्चिदानंद सघन । तेंचि निजांगें स्वयें आपण । अखंडैकरस ॥१॥तेथें न होऊन माया उद्भवली । विद्या अविद्यात्मक नाथिली । तेचि बत्तिसां प्रकारें विभागली । ईशादि तृणांत ॥२॥त्या बत्तिसांत प्रकार तीन । जड चंचळ तिसरें चेतन ।परी तें मिथ्यारूप संपूर्ण । रज्जुसर्पापरी ॥३॥स्थावरजंगमात्मक पांच खाणी । हें तो केवळ असती जडपणीं ।चंचळामाजीही प्रकार तिनी । असती वेगळाले ॥४॥प्राण आणि कर्मेंद्रिय । हें चंचळत्वें जडमय । ज्ञानेंद्रिय आणि मन बुद्धि द्वय । चंचळत्वें जाणती ॥५॥परी जाणणें नव्हे मनबुद्धीचें । तें स्फोरकत्व प्रतिबिंब जीवाचें ।म्हणोनि परप्रकाशत्व साचें । बुद्धयादिकां चंचळा ॥६॥यया चंचळाचा तिजा प्रकार । वृत्तिरूप स्फूर्तिमात्र । ते निर्विकल्पत्वें जाहला विकार । परी ते जडरूप ॥७॥विद्या अविद्या तया स्फुरणीं । जडरूप असती दोनी ।जीवेशास्तव दिसती झळपणीं । चेतनत्वा ऐशी ॥८॥परी ते स्फूर्ति ते परप्रकाशक । एवं चंचलाचा प्रकार एक ।आतां तिसरें चेतन रूपक । जीवेश दोनी ॥९॥हे जरी चेतनत्वें दिसती । परी यासी रूपचि नसे निश्चितीं ।वाउगी मुख्य बिंबा ऐशी आकृति । भासली प्रतिबिंबा एवं चेतनहि जया नांव ।तेहि परप्रकाशक ईश जीव । मा येर तो चंचळ जड स्वभाव ।तथा सांगणें नको ॥१०॥या रीतीं हे बत्तीस प्रकारें । प्रगटले असती हे सारे । ऐशियासी कोण म्हणे खरे । भ्रमावांचोनी ॥१२॥जैसा प्रवाहीं वृक्षावरी बैसला । तो आपणातें असून विसरला ।जळीं पाहत असे जो पडिला । आपणचि जैसा ॥१३॥परी पडिला तो खरा असेना । खरा नाहीं तो कदा दिसेना ।नसे तो प्रियही होईना । तीं प्रकारें वृक्षस्थ ॥१४॥वृक्षस्थ बैसला जो आहे । तयामुळें पडिला दिसत आहे ।म्यां न पडावें जें वाटताहे । हें वृक्षस्थामुळें ॥१५॥तस्मात् आहे दिसे आणि प्रियकर तो एक वृक्षस्थचि साचार ।येर जो पडिला तो भासमात्र । नसे न दिसे अप्रिय ॥१६॥ऐशिया दृष्टांतासम । येक वास्तविक आत्मा ब्रह्म । येर हा बत्तीस तत्वांचा भ्रम । दिसे परी जाहला नाहीं ॥१७॥तयाचे अस्तित्वें हे आहेती । तयाच्या भासे हे दिसती ।तयाच्या प्रियास्तव प्रिय होती । उत्पत्तीकाळींही ॥१८॥वेगळे सत्यत्वचि यासी नसतां । आहे असें म्हणावें केउता ।तस्मात् वास्तविक यासी असत्यता । सप्रत्यय असे नाहीं ते कदा दिसतीना । तरी केवीं वर्तती सचेतनपणा । म्हणोनि जडरूपता संपूर्णा ।असे अकृत्रिम ॥२७७०॥क्षणां आवडती क्षणां विटती । तरी प्रियत्व कोठें ययाप्रती ।आणि सदा सुखःदुखें शिणती । म्हणोनि दुःखरूप ॥२१॥एवं असज्जड दुःखात्मक । हे अनात्मजात सकळिक । जरी जीवेश हे चेतनरूपक । परी समान सर्व ॥२२॥ब्रह्मात्मा एक सच्चिदानंद । पूर्णपणें एक अभेद । या सर्वांमाजीही विषद । अस्ति भाति प्रियरूपें ॥२३॥सर्वत्रीं असे आहेपणा । सर्वत्रीं ब्रह्मात्मा देखणा । सर्वीं प्रिय अकृत्रिमपणा । असे स्वतः सिद्ध ॥२४॥याचा उत्पत्ति स्थिति संहार । पर तिहीं काळीं आत्मा निर्विकार ।अथवा सुषुप्ति स्वप्न जागर । या तिहींमाजी अखंड पांचचि कोश सर्व तत्वांचे ।पंचकोशात्मक देहत्रय साचे । देहत्रयीं नाम व्यापाराचें । जागर स्वप्न सुषुप्ति ॥२६॥देहादि स्फूर्ति यया सर्वीं । रूपीं व्यापून चिन्मात्र गोसावी । इतुकीयाची वर्तणूक व्हावी । या गुणदोषींहि व्यापक एवं धर्म धर्मीरूप गुण । सर्वत्रीं व्यापला सच्चिद्घन । परी त्या त्या विकारा न स्पर्शीं आपण । परीपूर्ण जैसातैसा तिहीं अवस्थेंत एकरूप । कधींच नव्हे अधिक अल्प ।अवस्थाचि पालटती आपोआप । येक येतां दोनी जाती ॥२९॥असो रूपीं अथवा गुणदोषीं । ब्रह्मात्मा येक निर्विशेषीं । व्यापकत्व असोनि अशेषीं । धर्मधर्मीं ऐसा नव्हे ॥२७३०॥ऐसा असंग ब्रह्मात्मा पूर्ण । असोन कैसें जाहलें विस्मरण ।व्यर्थ सर्व तादात्म्याचा अभिमान । घेऊनि बंधनीं पडे मी माझे आणि कर्ता भोक्ता ।हे वाउगीच घेतली अहंता । पापपुण्य कल्पून योनी अनंता ।भ्रमें जन्मे मरे ॥३२॥जरी ऐसें अज्ञानेकडून । जीव भोगी जन्ममरण । परी ब्रह्मात्मा जो सच्चिद्घन । निर्विकारत्वें सदा ॥३३॥ऐसा वाउगाच नसोनि बंधनीं । पडिला जीव अभिमान घेऊनी ।हा भ्रम जाईल जेव्हां निपटूनी । तेव्हांचि मोक्ष ऐसा बंधमोक्षाचा निश्चितार्थ । मज बाणविला कृपायुक्त । परी मी मंदप्रज्ञ असे जो सिद्धांत ।निश्चय बाणेना कारण कीं ब्रह्मात्मा जो असंग । सर्वांहून विलक्षण अंग । प्रतीतीस आला नाहीं अभंग ।स्फूर्तिअभावीं कैसा ॥३६॥माया विद्या अविद्यात्मक स्फूर्ती । मावळतां असे जो सच्चिन्मूर्ती ।तो स्वानुभवें अपरोक्ष रीती । कैसा तो निश्चय नव्हे ॥३७॥तो ब्रह्मात्मा तरी आपण । येर हीं अनात्मजात तत्त्वें संपूर्ण । येविशीं कांही नसे अनुमान । परी सर्वांतीत कैसा न कळे स्फूर्तिपासून ऐलीकडे । ज्या ज्या रीतीं स्वानुभवें आतुडे । तें निवेदूं गुरुचरणापुढें । यथामति कळलें तें ॥३९॥सर्वांमाजी जो आहेपणा । स्वतःसिद्ध असे पूर्णपणा । त्यावीण या सर्वांसी असेना । रूपचि कांहीं ॥२७४०॥सर्प नाहीं अतर्बाह्य दोरी । तैसा सर्वी ब्रह्मात्मा निर्विकारी ।सर्व नाहींतचि व्यर्थ भासली सारीं । भ्रमेंकडोनी ॥४१॥आहे ते अंतर्बाह्य सघन । सद्रूप ब्रह्मचि परिपूर्ण । तिहीं अवस्थेंतही येकपण । भेदावेना ॥४२॥ऐशी सद्रूपाची प्रतीति । गुरुकृपें बाणली निश्चतीं ।चिद्रूप अनुभविले तें यथामती । निवेदूं चरणी ॥४३॥जागृतीचे पंचव्यापार । शब्दस्पर्शादि विकार ।ते शब्द स्पर्श सांडून दूर । ज्ञान एक निवडिलें ॥४४॥तेंचि ज्ञान स्वप्नंकाळीं । अविच्छिन्नभास विषयमेळीं ।तया ज्ञानासी विकार समूळीं । सहसा असेना ॥४५॥तेंचि सुषुप्तिकाळीं नेणिवेंत । नेणपणासी अवलोकित ।हा प्रत्यय उत्थानकाळीं येत । सामान्यत्वाचा ॥४६॥गुण विकाररहित उगेपणीं । ज्ञान प्रत्यय येतें स्फुरणीं ।परी स्फुरण जातां मावळूनी । शून्यदशा होय ॥४७॥दृश्यामाजीं दृश्याचा देखता । तो द्रष्टा अनुभविला दृश्यापरता ।भासामाजील भासाचा जाणता । भासातीत साक्षी ॥४८॥एवं चिद्रूपस्फुरण उद्भवतां कळे । परी स्फुरण जेधवां मावळे ।ते वेळीं लया साक्षी न कळे । तळमळ यास्तव ॥४९॥आणीकही येक संशय थोर । स्फूर्तिकाळीं जे ज्ञान साचार ।तें ज्ञान आणि जीवविकार । कालवले वाटे ॥२७५०॥येर हे बुद्ध्य़ादिक वृत्ति । इंद्रियद्वारा विषय घेती । अथवा निर्विकल्प जे स्फूर्ती । परप्रकाशकत्वें ॥५१॥ऐशिया वृत्तिविरहित । जें का चिद्रूप असें व्याप्त ।तें अनुभवा ये टळटळित । साक्षी रूप जाणतां ॥५२॥परी जीवाचेंही जाणतेपण । प्रतिबिंबित मिथ्या असून ।शुद्ध ज्ञानामाजी असे मिळून । तें निवडितां न ये ॥५३॥एवं चिद्रूपाचें कळणें ऐसें । अनुभविलें तें निवेदिलेंसें । आतां आनंदरूपही कळलें जैसें । तैसें निवेदूं ॥५४॥देह प्राण इंद्रिय मन । अथवा द्वेषादि सर्व जन ।आत्मा आवडता यां सर्वांहून । प्रतीति असे ॥५५॥येरांची आवडी क्षण क्षण । उठे विटत असे म्हणून ।हे प्रियचि न होती संपूर्ण । खरा आवडता आत्मा ॥५६॥सुषुप्तिमाजी तो सर्वांचा लय । होतां सुखदुःखाचा क्षय ।येक सुखरूपचि अद्वय । असे निजात्मा ॥५७॥उगेपणींही सामान्य वृत्तीसी । सुखाकरिता वाटे कांहीशी ।परी सर्वां विलक्षण सुखैकराशी । अनुभवा न ये ॥५८॥एवं सच्चिदानंद आत्मा पूर्ण । यथामति होय जो वेदन ।तो श्रीगुरुचरणीं केला निवेदन । आणीक विनंती येक हे सर्व असज्जड दुःखात्मक ।बत्तीस तत्त्वें सर्व मायीक । उत्पन्नचि नसतां कांहीं येक ।मावळती तरी काय ॥६०॥रज्जूवरी सर्प नसतां । दवडावा वधावा केउता ।तैसा लयचि व्हावा समस्तां । इच्छी कवण ॥६१॥जेवीं असती तेवीं पूर्व रीतीं । असेनात कां सहजगती ।अथवा स्वस्वव्यापारीं प्रवर्तती । तरीही संशय असेना ॥६२॥परी आपुलें असंगत्व पूर्ण । क्षणांक्षणां त्यांचें विस्मरण ।या मिथ्यासीच होतसे मीपण । आपण ते नसतांही ॥६३॥जेधवां मीपण देहादिकाचें । तेधवां विस्मरण असंगाचें ।जेधवा विस्मरण आत्मयाचें । तेंव्हा मी म्हणे देहा ॥६४॥एवं मीपणा जो देहादिकांचा । तेव्हांचि घात पूर्णत्वाचा ।हा विक्षेप निपटून जाईल साचा । ऐसें केलें पाहिजे ऐशी प्रार्थना करूनि रविदत्त ।साष्टांग नमून प्रदक्षणा करित ।हे जाणोनि आचार्यें त्वरिता उचलोनी आलंगिला बापा तुला सर्व आशय ।कळला कोणकोणता तो संशय । आणि बाणला जो जो प्रत्यय ।तोही विदित झाला ॥जे जे तुला संशय असती । ते ते अनुक्रमें फेडूं भ्रांति ।आणि तुजला तुझी स्वात्मप्रताति । यथार्थ बाणवूं ॥६८॥आतां निरूपणीं चित्त द्यावें । आणि सांगू तैसें अभ्यासावें ।तरी तुझें तुजसी बाणवावें । निःसंशय समाधान ॥६९॥प्रथम तुजला आत्मा जीव । येकचि वाटला उभय स्वभाव ।स्फूर्ति जीवाची आणि स्वयमेव । चिद्रूपता येकवटली ते आधीं देऊं निवडून ।सत्य मिथ्या ह भिन्न भिन्न । पुढें आणीकही तुझे प्रश्र्न । साकल्य निरोपूं ॥७१॥आतां सावधान सावधान । बहु तत्पर ऐके निरूपण । ऐसें ऐकतां रविदत्त आपण बद्धांजलि बैसला ॥७२॥येथें रविदत्ताचिये पांतीं । सावध असावें श्रवणार्थी श्रोतीं ।आचार्य ओळले कृपामूर्ति । भाग्यार्थ मुमुक्षूच्या ॥७३॥मुक्तासुमत्तुत्रवद्विद्विविकल्पोषुचितिस्तथा ॥९॥मुक्ताभिरावृतंसूत्रंमूक्तयोर्मध्यईक्षते ॥तथावृत्तिविकल्पौश्चित्स्पष्टामध्यविकल्पयोः ॥१०॥जैशी मुक्ताफळांची माला । माजीं तंतु असे गोविला । तैसा बुद्धिविकल्पामध्यें संचला । सामान्य चित्प्रकाश ॥७४॥मुक्तें सूत्र जेवीं आच्छादत । तेवीं चिद्रूप विकल्पीं गुप्त ।मोतीं सारितां सूत्र दिसत । तेवीं विकल्पामध्यें चिद्रूप मोतीं एक उपलक्षण । परी मणिजात संपूर्ण । अंतरी सूत्र ते अविच्छिन्न । येकचि असे ॥७६॥परी येकेक मणि ठेलून बैसतां । माजील सूत्र न दिसे वरुतां ।तोचि मणि मागें पुढें सारितां । मध्य संधीसी तंतु दिसे ॥७७॥तैसा ब्रह्म आत्मा सर्वों व्यापक । अनंत अपरिमित एक ।सूत्रा ऐसा दृष्टांत कौतुक । दिधला असे ॥७८॥मणी बहु अनेकापरी । परी सूत्र एकचि निर्धारी । ब्रह्मात्मा सर्व तत्त्वांमाझारीं । एकचि अनुस्युत ॥७९॥ब्रह्मात्मा तो पहिलाचि संचला । आकाशवत् व्यापक कोंदला ।बुद्धि वृत्तीपासून उठती । इंद्रियद्वारा विषयीं आदळती । तेथून येथवरि चंचळ गति । परी समाप्ति तत्क्षणीं ॥८०॥इकडे तो समाप्ति तत्क्षणीं जाहली । परी दुसरी कल्पना ठेपून आली । ते आदळून जरी मावळली । तरी तिसरी सिद्ध ॥८१॥ऐसे विकल्प बुद्धीवृत्तीचे । येका संलग्न येक उठती म्हणोनि मणि जैसे ठेपिले माळेचे । तैसे विकल्पासी विकल्प परी मणि असे एकदेशी ।विकल्प बुद्धीपासून उठतां वेगेशी । विषयांत आदळतां जाऊन त्यासी समानता न घडे परंतु मणि जैसे बहुत असोनि । येकमेकां राहिले ठेपोनी । तैसें विकल्प येकमेकां लागोनी । संधीविण मिळाले म्हणोनि मुक्तें दृष्टांतासी । दिधलीं असतीं चमत्कारासी । परी तो तंतु आणि मणी यासी । साहित्य कैचें ॥८५॥तंतु आंतचि राहिला । आत्मा तो अंतर्बाह्य संचला । परी एक म्हणून दृष्टांत दिधला । येरव्हीं साम्य कैचें ॥८६॥मणीही तैसेच साकार । संकल्प तो आकारेंवीण उद्गार ।परी दृष्टांत दिधला येकत्र । मिनले मणिया ऐसे ॥८७॥आणिकहि येक असे कारण । सूत्रातें मणि करिती आच्छादन ।तैसें विकल्पाचें जाळें मिळून । चिद्रूप आच्छादिलें यास्तव दृष्टांतासी दिधलें । म्हणून साम्य न पाहिजे कल्पिलें । चिद्रूप सूत्रा ऐसें नाहीं वळलें ।कीं मुक्ता ऐसे विकल्प असती ॥८९॥कोणी मानील शंकाकार । कीं साम्य दृष्टांत काय नसती येर ।परी दृष्टांताच्चा चमत्कार । असे तो बोलूं ॥२७९०॥मुक्तमाळा असे स्वाधीन । मणि सारितां ये स्वकरेंकडून ।तंतु दिसतसे संधी मधून । स्पष्ट अपरोक्ष ॥९१॥तैसे विकल्प रोधितां यती । तेव्हां स्पष्ट चिद्रूप ये प्रतीति ।येर दृष्टांत बहु असती । परी पराधीन ॥९२॥तेही साम्य जे दृष्टांत । बोलिजेती सावचित्त । आणि ते पराधीनही असत तेंही कळेल ॥९३॥आकाश एक परिपूर्ण सघन । तैसा आत्मा चिद्रूप आपण ।तया आकाशा बहु मेघ मिळून । आच्छादिती पाणी ॥९५॥पाणी अथवा गगनासी । सर्व साम्यता घडे आत्मयासी ।व्यापकत्व आणि निराकारासी । साहित्य पडे ॥९६॥परी एका पराधीनत्वामुळें । दृष्टांतासी नाहीं योजिलें ।कीं मेघ अथवा तरंग जाळें । स्वतां सारितां न येती ॥९७॥विकल्प रोधन पाहूं येती । मध्यें चिद्रूप येतसे प्रतीती ।मणि जैसें करें चाळिती । जेव्हां टळटळीत सूत्र ॥९८॥इतुकिया हेतू मुक्ताफळांचा । दृष्टांत दिधला असे साचा ।कीं साधकें अभ्यास विकल्पाचा । रोध करोनी पहावें ॥९९॥सर्व साम्य जरी पहाणें । तरी आकाशाचा दृष्टांत घेणें ।विकल्पाचा जरी रोध करणें । तरी स्वीकार मुक्तांचा ॥२८००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.